Tuesday, September 18, 2018

सामान्य अध्ययन Practice Test – 1



1) 1857 च्या उठावाबाबत 'कार्ल मार्क्स' यांनी काय मत मांडले होते?
1. स्वातंत्र्य संग्राम
2. सामान्य जनतेचा उठाव
3. सैनिक विद्रोह
4. महान राष्ट्रीय उठाव


2) 'नीलदर्पण' नाटकाच्या धर्तीवर कोणत्या लेखकाने 'जमीनदार दर्पण' हे नाटक लिहिले होते?
1. नुरूलुद्दीन
2. विष्णुचरण विश्वास
3. मुशर्रफ हुसेन
4. दिगंबर विश्वास

3) पहिले अखिल बंगाल विद्यार्थी संमेलन 1928 साली कोलकत्ता इथे भरले होते , या संमेलनाचे अध्यक्ष कोण होते?
1. जवाहरलाल नेहरू
2. सुभाषचंद्र बोस
3. महात्मा गांधी
4. अरविंद घोष

4) "अहिंसा हा मानवधर्म आहे, तर हिंसा हा पशु धर्म आहे. मात्र , भेकडपणा व हिंसा यांत निवड करावी लागली तर मी हिंसेची करेल." हे प्रसिद्ध विधान कोणत्या भारतीय नेत्याचे आहे?
1. दादाभाई नौरोजी
2. महात्मा गांधी
3. जवाहरलाल नेहरू
4. सुभाषचंद्र बोस

5) भारतात 8 उद्योगांना मूलभूत उद्योग मानले जाते. (Core Industries)या मूलभूत उद्योगात सर्वाधिक वाटा कोणत्या उद्योगाचा आहे?
1. वीज निर्मिती
2. लोह पोलाद उत्पादन
3. कोळसा उत्पादन
4. पेट्रोल शुद्धीकरण प्रकल्प

6) संविधान निर्मितीसमयी कामकाज पार पाडण्यासाठी काही समिती स्थापन करण्यात आलेल्या होत्या.त्या समितीपैकी 'मुख्य आयुक्त प्रांतांबाबत' समितीचे प्रमुख/अध्यक्ष कोण होते?
1. अल्लादी कृष्णस्वामी अय्यर
2. पट्टाभी सीतारामैय्या
3. डॉ. राजेंद्रप्रसाद
4. डॉ. के.एम.मुन्शी

7) भारतीय संविधानाचा संरचनात्मक भाग वैशिष्ट्यपूर्ण आहे. भारतीय संविधानाच्या संरचनेचा स्रोत कोणता आहे?
1. अमेरिका राज्यघटना
2. 1935 चा भारत सरकार कायदा
3. इंग्लंड राज्यघटना
4. कॅनडा राज्यघटना

8) भारतातील प्रथम श्वान उद्यान देशातील कोणत्या शहरात तयार होत आहे?
1. बेंगळुरू
2. हैद्राबाद
3. कोलकत्ता
4. चेन्नई

9) 1904 सालचा भारतीय विद्यापीठ कायदा - कोणत्या समितीच्या शिफारशीवर आधारित होता?
1. सर अँड्र्यू फ्रेजर
2. भुपेंद्रनाथ बसू
3. टॉमस रॅले
4. विल्यम स्मिथ

10) भारतात खुल्या व्यापार तत्वाचा पुरस्कार करणारा व भारतातील सर्व बंदरे व्यापारासाठी खुली करणारा गव्हर्नर जनरल/व्हाईसरॉय कोण होता?
1. लॉर्ड डलहौसी
2. लॉर्ड रिपन
3. लॉर्ड विल्यम बेंटिक
4. लॉर्ड कर्झन


उत्तरे
1. 4
2. 3
3. 1
4. 2
5. 4
6. 2
7. 2
8. 2
9. 3
10. 1

No comments:

Post a Comment